Search This Blog

Friday, December 2, 2016

फेलोशीप

तुम्हला ग्राम विकास फेलों म्हणून का काम करायचे आहे?
मी मुंबई महापालीकेत सध्या कार्यरत आहे. परंतु, मी मूळ रत्नागिरी जिल्ह्याचा रहीवासी आहे. भारताच्या विकासाच्या वाटा गावांमधून जातात, असं माझं ठाम मत बनलं आहे. गावांचा विकास अस्ताव्यस्त होऊ नये, यासाठी विविध प्रकारच्या ज्ञानशाखांच्या उपयोजनाची गरज सध्या भासते. समाजात सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात अमूक एक गोष्ट केली तर विकास गतिमान व सुयोग्य पद्धतीने होईल अशी संकल्पना असते. माझ्या मनातील ग्रामविकासाच्या संकल्पना आजमावून पाहण्यासाठी ग्रामविकास फेलोशीप ही एक उत्तम संधी आहे याची मला खात्री वाटते.

स्थानिक लोकांसाठी काम करण्याच्या हेतूने फेलोजची नेमणूक महाराष्ट्रातील दुर्गम भागात करण्यात येणार आहे; त्या अनुषंगाने तुमच्याकडे असे कोणते अनुभव आहेत ज्यामुळे तुम्हाला वाटते कि तुम्ही अशा दुर्गम भागात काम करू शकाल?
माझं लहानपणाचा बराचसा काळ मी एका कोकणी खेड्यातील आजोळी व्यतीत केला आहे. तसंच इंजीनीअरींगच्या शैक्षणिक काळापासून बऱ्याचदा दुर्गम भागात निवासी ट्रेकींगसाठी जाण्याचेही योग आले. यावेळी पाहीलेल्या गावांच्या स्थितीत बदल घडावा असं मला नेहमी वाटत आलं. यासाठी मी माझी नोकरी सांभाळून संजय यादवराव यांच्या 'कोकणभूमी प्रतिष्ठान' ने आखलेल्या 'समृद्ध कोकण अभियान' मध्ये सहभाग घेतो. स्टॉकहोम वॉटर प्राईज विजेते डॉ. राजेंद्रसिंह आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या जलचेतना मोहीमेत मी स्थापत्य अभियांत्रिकीचे ज्ञान वापरून ग्रामविकासाचे प्राथमिक आराखडे बनविण्यात माझ्या सहकाऱ्यांना मदत करतो. यात प्रत्यक्ष क्षेत्रभेटी ते संगणकावरील सादरीकरण अशा सर्व बाबींचा समावेश होतो. शासकीय यंत्रणेचा अंतर्गत अनुभव ही माझी जमेची बाब आहे.

फेलोशिप कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या अनुभवाचा वापर तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात कशा पद्धतीने करू इच्छिता?
गावांचे येत्या काळात शहरीकरण अटळ आहे. परंतु, त्यात गावांचे बकालीकरण होऊ नये. ग्रामीण भागात जपल्या गेलेल्या काही शाश्वत मूल्यांचे, संस्कृतीचे व सर्वांत महत्वाचं म्हणजे निसर्गाचे संवर्धन व्हावे , ग्रामविकासाची प्रक्रीया संतुलित राहावी यासाठी एक लवचिक चौकट बनवता येईल का प्रश्नावर माझा भर आहे. एक वर्षाच्या फेलोशीपच्या काळात याबाबतचे बरेचसे ज्ञान माझ्याकडे संकलीत होईल ज्याचा लाभ शासन, ग्रामविकासासाठी कार्यरत असलेल्या असलेल्या व्यक्ती व संस्थांना देणे शक्य होईल.

No comments:

Post a Comment