Search This Blog

Tuesday, September 1, 2015

भूमिका

.
      पूर्वी शाळकरी वयात 'श्रीमान योगी' वाचलं होतं. एखाद्या गोष्टीसारखी ती ऐतिहासिक कादंबरी तेव्हाही फारशी रूचली नव्हती. त्या व्यतिरिक्त कुठलही शिवचरित्र वाचनात आलं नव्हतं. 'छावा', 'पानिपत', 'संभाजी' यांचं वाचन सुद्धा शाळेतच कधीतरी केलेलं. त्यातल्या त्यात पानिपत आवडलेलं. पण ती कथारूप मांडणी फार आवडायचीच नाही. त्यात भावनांना नेहमी जास्त वजन असायचं, जरा तटस्थपणे केलेली मांडणी कुठे नाहीच. मग नंतरच्या काळात सुहास शिरवळकरांचे 'मंदार, फिरोज, दारा बुलंद' , इयान फ्लेमिंगचा 'जेम्स बॉन्ड' जवळचे वाटू लागले तशा ऐतिहासिक कादंबऱ्या वाचण्यापासून मी दूर झालो. मग अलिकडे राजकारणाची आवड वाटू लागली आणि पुन्हा छत्रपती शिवाजी या व्यक्तिविषयी कुतूहल जागं झालं.
      साधारण चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. दादर स्थानकाबाहेर पश्चिमेला असलेल्या 'आयडीयल' या पुस्तक दुकानात गेलो होतो. तिथे पुस्तकं विकत घेण्याआधी चाळून पाहता येतात. छत्रपती म्हटल्यानंतर साधारणतः बाबासाहेब पुरंदरे लिखीत 'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाची शिफारस केली जाते. त्यानुसार मी राजा शिवछत्रपती चाळू लागलो. त्यात भराभर पाने पलटतानाही जवळपास प्रत्येक पात्राच्या जातीचा उल्लेख केलेला आहे, असं लक्षात येऊ लागलं. शिवाय ती मांडणीही एखादं प्रवचन किंवा किर्तन गद्य स्वरूपात असावं तशी वाटली. प्रत्येक पात्राची जात जाणून घेणं माझ्यासाठी महत्वाचं नव्हतंच. म्हणून ते पुस्तक सरळ बाजूला ठेवून मी इतर काही मिळतंय का ते शोधू लागलो.
        त्याच ठिकाणी श्रीनिवास दा. सामंत यांनी लिहीलेलं छत्रपती महाराजांचा युद्धनिती व इतर बाजूंनी वेध घेणारं 'वेध महामानवाचा ' हे पुस्तक गवसलं. लेखक एका नावाजलेल्या संस्थेत रसायनशास्त्राचे प्राध्यापक असल्याने त्यांनी संशोधकाच्या दृष्टीनेच शिवराय मांडले आहेत. बस. ते पुस्तक मी आजही आवडीने उलटसुलट मधूनच कुठूनही वाचतो. उंबरखिंडीच्या लढाईचं विश्लेषण तर अप्रतिमच.
        बाकी पुरस्कार कशाच्या आधारावर मिळतात हे मला आजही ठाऊक नाही. कुठल्याही वादात दोनपैकी एक बाजू घेतली नाही तर मी तटस्थ आहे असा याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ या वादाला अजून एक बाजू आहे!
        बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकरणात वाद घालणाऱ्या दोन्ही बाजू माझ्या बाजूने अगदीच केविलवाण्या दिसत आहेत

No comments:

Post a Comment